Wednesday, May 27, 2015

नापास झालात म्हणून काय झाले?


सर्व नापास झालेल्या विद्यार्थ्यांनो निराश होऊ नका. आज तुम्ही नापास झाला ते एका सामान्य परीक्षेत, अजून जीवन पूर्ण बाकी आहे. परीक्षेत नापास होणे म्हणजे जीवनात अपयशी होणे नव्हे.
एक खूप अर्थपूर्ण गोष्ट माझ्या वाचनात आली.
एकदा एका सिंहाने सर्व प्राण्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. परीक्षा सुरु झाली. पोहण्याच्या परीक्षेमध्ये मासा पहिला आला इतर सर्व प्राणी फेल झाले. सिंहाने माशाचे अभिनंदन केले व इतर सर्वाना नालायक म्हणून हिणवले.
काही काळानंतर धावण्याची परीक्षा झाली. हरीण पहिले आले, कासव नापास झाले. माशाला तर पळण्याच्या परीक्षेत प्रवेशच घेत आला नाही. उंच उडण्याच्या परीक्षेत गरुड पहिला आला, अनेकांना उडताच आले नाही. सिहाने जाहीर केले कि, ज्यांना उडता येत नाही ते सर्व फेल आहेत.
मित्रांनो, आपणाला एखादी गोष्ठ येत नाही याचा अर्थ आपण नालायक होत असा होत नाही. कदाचित आपली आवड वेगळी असेल, आपले गुण वेगळे असतील, ती आवड ओळखा, आवडीचे काम करा, यश नक्की मिळते.

मित्रांनो, आपली लायकी ठरवण्याचा अधिकार दुसर्यांना देऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा. मेहनत करा, संपूर्ण आयुष्य समोर आहे, स्वतःला ओळखा, प्रयत्न करा, आपला यशाचा मार्ग स्वतः ठरवा.
आजची शिक्षण पद्धती फक्त कारकून व नोकर तयार करण्यासाठी आहे. असे अनेक उद्योग धंदे आहेत जे कोणीही करू शकतो. जगात शिकलेल्या मुलापेक्षा नापास झालेल्या विद्यार्थांनी उज्वल यश संपादन केले याची अनेक उदाहरणे आहेत.
मित्रांनो, लक्षात ठेवा तुम्ही परीक्षेत फेल नाही झालात, तुम्हाला ओळखण्यात, तुमचे गुण समजून घेण्यात,  परीक्षा घेणारे फेल झाले आहेत. निराश होऊ नका, चांगली पुस्तके वाचा, चांगल्या व्यक्तींना भेटा, थोरांची चरित्रे वाचा, आपले जीवन उज्वल करा.

Friday, May 8, 2015

Angkor Wat-Cambodia!


भारत म्हणजे तेजस्वी भुमी! ज्ञानीविद्वान लोकांचा देश! बुद्धिमान लोकांचा देश! सुसंस्कृतसभ्य व विशाल दृष्टीकोन असणाऱ्या लोकांचा देश! 
भारत जेव्हा प्रगतीच्या शिखरावर होतासर्व बाबतीत महासत्ता होता त्या काळी भारतीयांनी प्रेमअहिंसाइ. गुणाचा प्रचार व प्रसार केल. कुठेही अतिक्रमण केले नाही,कोणालाही लुटले नाहीउलट आपल्याकडील संपत्तीने त्यांना समृद्ध केले. भारतीयांनी इतराना जगणे शिकवलेसंस्कृती दिलीशिक्षण दिलेव त्यांना स्वजन मानून सन्मान केला. 
भारतीयांच्या उदारतेचे एक उत्तम उदाहरण म्हणजे कंबोडिया मधील अंकोर वाट सारखे  हिंदू मन्दिरे.  

बाराव्या शतकामध्ये राजा सूर्यवर्मन याने बांधलेले विष्णू मंदिर हे आजही जगातील सर्वात मोठे मंदिर आहे. स्थापत्यशास्त्रखगोलशास्त्रशिल्पकलाइ शास्त्राचा जगातील सर्वोच्च अविष्कार म्हणजे अंगकोर वाट मन्दिर. 

संस्कृतमधील "नगर" या शब्दाचा अपभ्रंश ख्मेर भाषे मध्ये "नोकोर" असा झाला व त्यावरून "आंग्कोर" या शब्दाची व्युत्पत्ती झाली. "वाटिका" या शब्दापासून "वाट" या शब्दाची निर्मिती झाली. अंकोर’ या शब्दाचा मूळचा अर्थ ‘नगर’ असा असलातरी नंतरच्या काळात ‘देऊळह्याही अर्थी हा शब्द रूढ झाला. 
अंकोर वाट मंदिराच्या बाजूला प्रचंड मोठी भिंत बांधलेली अहे. त्या बाहेर १९० मीटर रुंद व आठ मीटर खोल असा भला मोठा मानवनिर्मित खंदक खोदला अहे. खंदकाचा घेर सुमारे २० किमी एवढा मोठा अहे. 
 एकावर एक असणाऱ्या तीन चौथऱ्यावर या मंदिराची उभारणी केलेली अहे. प्रत्येक चौथऱ्याची उंची सु. साडेचार ते सहा मी. एवढी अहे. मुख्य मंदिर २०४ मी. रुंद व २२१ मी. लांब व ६६ मी. उंच आहे. या मंदिराचे मुख्य प्रवेश द्वार पश्चिम दिशेला अहे. मुख्य मंदिर हे पुराण ग्रंथातील मेरु पर्वताची प्रतिकृती अहे. 
मुख्य मंदिराच्या सभोवती सुरेख भिंती आहेत. त्या मेरूपर्वताला घातलेल्या वासुकी नागाच्या विळख्याचे प्रतीक मानल्या जातात. मुख्य मंदिरापासून चौथ्या भिंतीसभोवती खणलेल्या खंदकाला क्षीरसागराचे प्रतीक समजले जाते. 
हे मंदिर वालुकाश्माच्या (sandstone) प्रस्तरापासून बनवलेले अहे. 

मुख्य मंदिरातील सर्वांत बाहेरील भिंतीवर अत्यंत कलात्मक पद्धतीने विविध विषयावर आधारित कोरीव काम केलेले अहे. यामध्ये रामायण व महाभारता मधील अनेक प्रसंग कोरलेले आहेत. दक्षिणेकडील भिंतीवर राजा सूर्यवर्मन व त्याच्या सेनापतींची चित्रे कोरली आहे तर पूर्वेकडील भिंतीवर देव व दानव यांच्यातील मेरूपर्वताच्या साहाय्याने क्षीरसागर घुसळण्याच्या प्रसंग कोरलेला आहे. या शिवाय भगवान विष्णूंनी केलेला असुरांचा पराभव,माणसाच्या चांगल्या वाईट कृत्यामुळे मिळणारे स्वर्ग व नरकश्रीकृष्णाने केलेला बाणासुराचा वधदेव आणि असुर यांचा संग्राम अशी अनेक शिल्पे कोरलेली आहेत. याशिवाय त्या काळातील जन जीवनरावणाने कैलास पर्वत उचलण्याचा केलेला प्रयत्न,यासारखे अनेक दृश्ये कोरलेली आहेत. 
अंकोर वाट मंदिरातील एक मुख्य आकर्षण म्हणजे विविध अलंकार ल्यालेल्या अप्सरा! तीन हजारापेक्षा जास्त अप्सरा कोरलेल्या असून विविध शैलीची केशभूषावेशभूषा,दागिने इ त्या काळाचे दर्शन घडवितात. 

प्रत्येक भारतीयाने एकदा तरी या मंदिरांना भेट दिली पाहिजे. आपली उच्च संस्कृती समजून घेतली पहिजे. जगभरातून लाखो लोक हि मंदिरे पाहण्यासाठी येत असतातपण भारतातील लोकांना त्याविषयी माहिती सुद्धा नाही. 
या ठिकाणी शिवब्रम्हविष्णू यांची अनेक मंदिरे अहेत. प्रत्येक मंदिर अत्यंत भव्य व वास्तुशास्त्राचा उत्कृस्त नमुना अहे. प्रत्येक मंदिराचा परिसर खूप मोठा अहे. सर्वत्र पाणी व हिरवीगार घनदाट जंगले आहेत. कंबोडीयाचे हवामान दमट स्वरूपाचे आहेतरी पण ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान चांगले हवामान असते.