Wednesday, December 7, 2016

शेतकऱ्यांची मुले बनविणार १००० गावांना रोख मुक्त (कॅशलेस)!



पुण्यातील वायूवा टेक्नॉलॉजी सोल्युशन्स प्रा ली या शेतकऱ्यांच्या मुलांनी सुरु केलेल्या कंपनीने १००० गावांना कॅशलेस करण्याचे ध्येय ठेवले आहे. 
आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नाला पूरक उपक्रम म्हणून १००० कॅशलेस व्हिलेज निर्माण करण्यात येणार आहे. 
श्री पुंडलिक सीताराम वाघ हे स्वतः शेतकरी असल्यामुळे गावाकडील समस्यांची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे नोटा बंदीच्या निर्णयानंतर शेतकरी व खेड्यातील लोकांना त्रास होऊ नये म्हणून या अँप ची निर्मिती करण्यात आली आहे. 
रोख मुक्त व्यवहार करण्यासाठी A Cashless App गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करावे. विक्रेता व ग्राहक यांच्यासाठी दोन स्वतंत्र App तयार करण्यात आले आहे. 
वस्तू खरेदी केल्यानंतर विक्रेत्याचा युनिक कोड ग्राहकाला दिला जाईल, ग्राहक तो कोड व रक्कम आपल्या App मध्ये टाकेल व रक्कम ऑनलाईन जमा करू शकेल. 
पैसे पाठवणे यशस्वी झाल्यानंतर विक्रेत्याला एक संदेश मिळेल. पेमेंट यशस्वीरित्या मिळाल्यावर व्यवहार पूर्ण होईल. 
विक्रेत्यांनी अँप डाउनलोड केल्यानंतर स्वतःचा बँक खाते क्रमांक व इतर आवश्यक माहिती भरायची आहे.  aCashless App हि सुविधा सर्वाना अगदी मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

aCashless ऍप चे वैशिष्ट्य म्हणजे अगदी सर्वसामान्य माणसालाही ते वापरणे सोपे जाणार आहे. पुण्यातील शेतकऱ्यांच्या मुलांनी सुरु केलेल्या वायूवा टेक्नॉलॉजी सोल्युशन्स प्रा लि या कंपनीने A Cashless App ची निर्मिती केली आहे. ग्रामीण भागातील जनतेला अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळावे व नोटबंदीचा त्रास होऊ नये यासाठी या ऍप ची निर्मिती केली आहे. अधिक माहिती साठी www.acashless.com या संकेत स्थळाला अवश्य भेट द्यावी. 
या उपक्रमासाठी लागणारे अँप हे पूर्णपणे मोफत पुरवण्यात येणार आहे. त्याशिवाय ग्रामीण व्यावसायिकांना व वापर कर्त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमासाठी आर्थिक मदत मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. तरी या उपक्रमासाठी मदत करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी श्री पुंडलिक वाघ याना संपर्क करावा. अधिक माहिती साठी ०९८८१०००९५० या क्रमांकावर संपर्क करावा किंवा www.acashless.com या संकेत स्थळाला भेट द्यावी. 



No comments:

Post a Comment